Wednesday 15 April 2020

मी कोरोना बोलतोय,

                                          मी कोरोना बोलतोय,

                            बॉस.....माझी दहशत संपूर्ण जगाने अनुभवली आहे, तसा मी दहशतवादी नाही आहे, नाही तशी माझी इच्छा आहे.तश्या प्रकारे मला बनवला आहे तुम्ही लोकांनी आणि मी तुमच्याच विरोधात उभा आहे.माझा जन्मदाता तुम्हीच आणि माझा कट्टर दुश्मन हि तुम्हीच...
                            मी माझी टीम घेऊन जगावर राज्य करण्यासाठी बाहेर पडलो आहे असेच तुम्हाला वाटत असेल पण तसे काही नाही....मला जगजेत्ता व्हायचे नाही ... आणि मी होणार हि नाही हे हि मला माहिती आहे. तुमच्या मानव जातीच्या विरोधात सुरु केलेले युद्ध मी जिंकणार नाही हे मला ठाऊक आहे, पण मी माझे कर्तव्य करत आहे, हां......हां .....कर्तव्य....
तुम्हाला प्रश्न पडला असणार, कोरोना ची कर्तव्य आणि काय....??? तुम्हाला पडलेला प्रश्न हि बरोबर आहे बॉस. मी तुमच्या जीवावरच उठलोय.....तुमच्या श्वसनाशी खेळतोय......तुम्हाला गुदमरून मारतोय....तडफडून मारतोय....तुम्हाला ऑक्सिजन घेऊ देत नाही...घुसमटून गेलाय ना तुम्ही.... हा...हा..हा..हा... पण तुम्हाला माहिती आहे काय..?? .... असे करताना मला छान वाटत नाही....पण काय करू..?? तुम्ही लोकांनी हे करण्यासाठी भाग पाडलाय...हां ...हां....तुम्ही लोकांनीच …..
                           पृथ्वी, जननी, काळी माय हे शब्द विसरलेला नाही ना..??? मी त्यांचा एक फॅन आहे. प्रगतीच्या नावाखाली तुम्ही तिच्या (पृथ्वी) जीवावर उठलाय...तिला रक्तबंबाळ केलाय...बॉस... ती तुम्हाच्या प्रदूषणाने गुदमरलेली आहे... तिलाही श्वास घेता येत नाही...घुसमटली आहे ती...तुमच्या कर्णकर्कश्य आवाजाने तिचे कांठाळ बसले आहे... इतक्यावरच ना थांबता तिच्या उदारमधील इंधन स्वरूपातील अवशेष संपवत निघालाय तुम्ही... तिच्या पशु - पक्षांना तुम्ही तडफडून मारलाय...तिचा आधार असणारे वृक्ष वल्ली सुद्धा तुम्ही संपवताच आणलंय..... आणखीन किती प्रगती करणार आहात तुम्ही... ??? माझ्या निसर्गाचे सोडाच वो....तुम्ही तर आई-बहिणींची अब्रू हि धोक्यात आणली आहे, गरीबाची लूटमार, गढूळ, स्वार्थी विचारांनी तुम्ही तुमची मानव होण्याची संकल्पना संपवत आणली आहे.... बॉस.....तुम्ही खूप चुकीच्या मार्गाने चालला आहेत.. थोडे आवरा...बॉस.... मी तिचा एक छोटासा फॅन आहे....जसे तुम्ही वागला आहात..तसाच मी तुमच्याशी वागतो आहे...
                                 बॉस.... आणि एक सांगू का तुम्हाला...??? तुम्हाला काय वाटते तुम्ही घरात बसून मला हरवलं..... हा...हा...हा... तुम्हला माहित नसेल पण, तुमच्यातीलच काहीजण मला सामील आहेत...घराबाहेर पडून ती मला सपोर्ट करत आहेत...माझी टीम वाढवण्यात मदत करीत आहेत....त्यामुळे मी लगेच माघार घेणार नाही हे तिथकच खरं आहे...
                                  पण, बॉस... इतकाच सांगतो आहे...तुम्ही जे काही ती (पृथ्वी) च्या विरोधात चालवलेलं प्रगतीच्या नावाखालाच नाटक लवकरच थांबवा...मला संपवशीला तुम्ही ...पण, माज्यासारखे खूप फॅन आहेत तिचे... प्रत्येकवेळी एक एक बाहेर येऊन तुम्हाला ते धडा शिकवतील....जजनी माझी भोळी आहे,तुम्हाला पाठीशी घालत आहे...पण, तुम्हाला अजून तिचा क्रोध माहित नाही....
                                    बरं... बॉस.....मला सांगायचे ते मी मांडले आहे....तुम्ही जरा आवरा......मी हि आवरतो......
                                                                                   - रविंद्र वराळे. 8806902020, 7385772829 (W)

                                                                                              www.manthanfoundationorg.com

Wednesday 11 January 2017

"विचार करा"

एकदा एका शब्दाने दुसऱ्या शब्दाला विचारले .....
‘काय रे, तुझी जात कोणती रे...???’ तस घाबरतच विचारले त्याने...कारण तो त्याचा जवळचा मित्रच होता. दुसरा शब्द गालातल्या गालात हसला...आणि कळल्यासारखं परत विचारले, का रे...? तुझी आणि माझी मैत्री जुनी आहे ... मग आजच असा प्रश्न तू का विचारलास मला...? असे का वाटले तुला ...? पहिला शब्द थोडासा गोन्धळाला पण लगेचच स्थिर होऊन ... सांग ना..? पण का असे विचारलेस सांग ना ?आपल्या मैत्रीत काय चुकले आहे का ?? दुसऱ्या शब्दाने हसतच पण थोडं गंभीर होऊन विचारले ...नाही रे ... मी असाच विचारले .  ओके.. मग मला आधी सांग तुझी जात कोणती ????? थोडासा विचारशीलपने प्रश्न केला ..दुसऱ्या शब्दाच्या या प्रश्नाला अगदी सहजच उत्तर मिळाले ... " क्रियापद".  दुसरा शब्द हसतच उत्तरला ....हे तुला कोणी सांगितले ???  पहिल्या शब्दाला काय समजेना ..... म्हणजे ..???. असा बाळबोध प्रश्न पहिल्या शब्दाने विचारला. दुसऱ्या शब्दाने मग अतिशय गंभीर होऊन समजावून सांगण्यास सुरवात केली....हे बघ मित्रा...तुझी- माझी कुळी मुळी आपण जर काढत गेलो तर ती एकच येईल. मग सुरवातीला होती का जात ??? मग सुरवातीला होता का धर्म ???? एकमेकांना मदत करत जगणं होत त्यांचं. त्यातून प्रत्येकजण जन्माला आला...आता कोणाच्या मुखातून, कोणता शब्द,केव्हा बाहेर आला हे पाहिलेय का कोणी ??? सांग ना तूच ???? नाही ना ....??? मग आपण कशी ठरवली आपली जात..???? कोणत्या जातीच्या ओठातून शब्द पडतो त्यावरून ..??? कि त्याच्या किमतीनुसार ..??? सांग ???   पहिल्या शब्दाला एवढे बौद्धिक जास्तच झाले बहुतेक तसा तो गोंधळूनच बोलला...नाही रे .... पण माणसांनी ठरवल्या ना आपल्या जाती..त्यांनीच केलं ना आपले वर्गीकरण ... तस दुसरा शब्द हसतच बोलला ...अरे हाच आपला प्रॉब्लेम आहे ...त्यांनी ठरवले आणि आम्ही वेगळे झालो..त्यांनी सांगितले म्हणून आम्ही गटात बसत गेलो...त्यांच्या स्वार्थासाठी,त्यांनी ठरवले आणि आम्ही सहजच विभागलो...का....????कारण आपल्याला आपले अस्थित्व माहित नाही किंवा आपण ते विसरलोय किंवा आपल्याला कळते आहे पण आपल्याला वळवायचे नाही आहे...???  बरोबर ना....पहिल्या शब्दाला बरोबर वाटलं.. तस त्याने मानेनंच सांगितलं.... ‘अरे आपली जात आहे "स्वर" आणि धर्म आहे "व्यंजन". हेच आपले मूळ आहे.’ पण मानवांनी त्यांच्या सोयीसाठी आपले वर्गीकरण केले.
संधी,जाती ,प्रयोग,समास,अलंकार,वृत्ते,शब्द सिध्दी,विरुद्धार्थी शब्द,समानार्थी शब्द, काळ . प्रकारे आपले वर्गीकरण केले. आणि आम्ही हि सहजच वेगळे झालोय.... यावर ...’होय रे.... खरंच कि’ ....असा पहिला शब्द बोलला..अरे आपल्याला वेगळे केलेच पण खरी गंमत हि कि मानवाने मानवानेच वर्गीकरण केले आहे ....थोडंसं हसरा चेहरा करत दुसरा शब्द पुढे बोलला...  ‘अरे त्यांनी त्यांच्याच अनेक जाती, अनेक धर्म पाडलेत...त्यातच ते अडकून पडलेत..त्यांचेही असेच झाले आहे अगदी तुझ्यासारखे...त्यांनाही आपला खरा धर्म, आणि खरी जात लक्षातच येत नाही आहे....."माणूस" हि त्यांची खरी जात आहे, आणि "माणुसकी" हा खरा धर्म ...पण ते विसरलेत पोटं भरण्याच्या नादात’...’हो यार ...खरंच आहे हे’...असे पहिल्या शब्दाच्या तोंडातून बाहेर पडले... ‘असो, आपण तरी एकी ठेऊ आपल्यामध्ये..’ असे दुसऱ्या शब्दाचे वाक्य ऐकून पहिला शब्द भानावर आला आणि बोलला.... ‘सॉरी यार ..मला माफ कर..मी आता कोणालाच असे नाही विचारणार उलट तू सांगितलेली माहिती मी इतरांना सांगणार भावा...खरंच आपल्यात एकी हवी....थँक यू भावा ....’ ‘अरे तू माझा चांगला मित्र आहेस थँक यू , सॉरी काय ...तुला चांगले सांगणे माझे कर्तव्यच आहे ...’ असे हसत, टाळी देत दुसरा शब्द बोलला...टाळीला साथ देत पहिल्या शब्दाने दुसऱ्या शब्दास मिठी मारली...
                                         ‘ ते दोन शब्द म्हणजे "विचार करा". ‘

                                                                                                        ----   रविंद्र .वराळे

Sunday 8 January 2017

                                "शब्द"  
माझी माय म्हणते ......
     आमच्यावेळी शब्दाला लय किमत असायची.....
       “शब्दासाठी जागायच्या सावूल्या.....
        शब्दासाठी जगायच्या मावूल्या....
        शब्दासाठी चालायचे पाउल......
        शब्दानेच जन्मायाचे देऊळ......”
मी म्हणालो...... माय आता हि तसेच आहे......
            “ देऊळात शब्दाचा जन्म धर्मात होतो
                    पाउल जातीचा होतो
             माउल्याच कोवळ्या जम्नावर उठतात
                   सावूल्या चढाओढीत फसतात....”
    असतात तेच शब्द........ फसवतात तेच शब्द.......
     कधी अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवतात, तर कधी जातीच्या नावाने भडकवतात.....
‘सुशिक्षित’ या शब्दचा अर्थच गवसला नाही अजून दिग्रीवाल्यांना.... व्यसनाधीन बनलेल्या तरुणांना.... काय माहित त्यांना “व्यसन” चा अर्थ काय घ्यायचा??? शब्दांचाच खेळ आहे सारा..... त्यात मनाचा विस्कटलेला पसारा... आता, कोण पुसतो शब्दाला... कोण जागतो शब्दाला.....
“आधी लगीन कोंढाण्याचे मग....... ”असे शब्द इतिहासातच पाहायला मिळतात अलीकडे. फसवणूक,लुबाडणूक,चारित्र्यहीन,लबाड बोलणे अशा शब्दातच गुरफटत गेलोय आपण....धर्म,जात,पंथ,स्त्री-पुरुष,मान-सन्मान,उच्च-निच्च अशा कितेक शब्दात आम्ही अडकलोय,अडकत गेलोय ... रंगाच्या नावाखाली दंगली घडवतात....घडतात आणि मग, दगड-काठ्यांनी साचलेल्या,रक्ताळलेल्या रस्त्यावरच्या एका बाजूच्या चौकातल्या कट्यावर बसून सहिष्णुताचे भन्नाट विचार मांडायचे. शब्दांच्या अधीन व्हायचे कि शब्दांना गुलाम करायचे ...??? कोडेचं सुटेनासे झालय ..... ‘सैराट’ झालेल्या वातावरणात तराठ सुटलोय आपण ....आणि कुठतरी न माहित असलेल्या ‘सुख’या शब्दाच्या शोधात वाळवंटात भटकतोय.....मृगजळ पाहून धावतोय धावतोय ....धावतोय आणि तोंडाला फेस आलेल्या बैलासारखे दमून भागून मग सावलीची अपेक्षा करणाऱ्या मनाची तहान संपणार का कधी?? पवित्रता,दिव्यता,निर्मलाता,सात्विकता,सकारात्मकता,संमान्नता,सभ्यता,शालीनता,संतुष्टता,श्रेष्ठता,स्वतंत्रता,सत्यता,नैतिकता,योग्यता,भावना,सयमं,स्वार्थी,आशा,प्रेम,बंधने,अशा अनेक शब्द्नाभोवती आपण आयुष्य खर्ची घालवतो आणि मग शेवटी आयुष नेमके काय ???? या शब्दाची उकल काढण्यात विचार करतो.....आपण भोगलेले,आपण जगलेले,आपण त्यागलेले असे सारे शब्द एकत्र करून सार काढला तर समजेल का जीवनाची उकल?????
माय म्हणते,
         “उकल जन्माची कळाया
         सुख-दुखाची क्षण मळावे लागतात
         हाताने थापून आकार द्यावा लागतो
        आणि खमंग भाजलेली भाकर आपली भूक भागवते”
   ‘आणि मग ......आणि भूक लागते..........’
                  अशी ती पुढे गमतीने म्हणते.........
                                                  -रविंद्र वराळे

Wednesday 24 August 2016

मग का करावी मी आत्महत्या ???

मग का करावी मी आत्महत्या ???
ग का करावी मी आत्महत्या ??? माझ्यासोबत माझ्यावर खूप सारं प्रेम करणारी माझी आई, कोणत्याही परिस्थितीत हातात हात घेऊन मी आहे बरोबर असं सांगणारे माझे बाबा,, माझे, मित्र, माझ्या मैत्रिणी आहेत… मग आणि काय हवं आहे मला..??? जे माझे कधी नव्हतेच त्याची का अपेक्षा मला? एवढा सुंदर निसर्ग सभोवती असताना आणखी कोणत्या सौन्दर्यात अडखळतोय मी? बिनधास्त मन मोकळं होऊ शकतं असे फ्रेंड सर्कल, मग आणखीन काय राहतं मनात जे शेअर करायला आणखीन कोणाची गरज पडते मला? कित्येक नियम, बंधने धाब्यावर बसवून बेधडक हुंदडत असतो, आणखीन कोणती मोकळीक हवी मला ?
“ ऐकावे जणांचे करावे मनाचे “...हेच सतत बिंबवलंय माझ्या मनावर, आता कितपत आणि कुठवर ऐकायचे मनाचे ? घरात कोंडतय मला, मोकळीक हवी, असे सांगणाऱ्या मनाचे ? तू विश्वास ठेऊनहि, ती धोका देते याचे पुरावे देणाऱ्या मनाचे ? तुझा सगळीच धिकारी करतात, तू का जगतो आहेस, संपव जीवन असे प्रोत्साहन देणाऱ्या मनाचे? नाही .... नाही ..... नाही ..... मी ऐकतो माझ्या बुद्धीचे, जी बुद्धी मला दाखवून देते जन्ममागचे रहस्य, ती सांगते मला… तुझी गरज आहे, तुझ्या आई बाबांना,तुझी गरज आहे तुझ्या मित्रांना, तुझी गरज आहे समाजाला, देशाला ... ती सांगते मला, हा निगेटिव्ह चष्मा उतरवून फेकून दे आणि निखळ वाहणाऱ्या तुझ्या मनात तुला आजवर न गवसलेले सुंदर विचारांचे खळ्खळ्णाऱ्या झऱ्यातील मोती... अगदी ओंजळीत घेऊन तुझ्याच दमलेल्या चेहऱ्यावर उधळून घे.... आणि मग बघ ... तुझ्यात दडलेला प्रकाशास कसा कवडसा मिळतो, तू तारा होशील काही क्षणार्धात ..., जो स्वतःबरोबर इतरांना देखील प्रकाशमान करेल ...जो जगण्यामागचा हेतू स्पष्ट करेल, विचार स्पष्ट करेल आणि शेवटी मनालाच भाग पडेल तुला सुचविण्यास कि, तुला जगायला हवं, ते सांगेल तुला, तुझी मलाही गरज आहे,तू जगलास तर आणि तरच मी जिवंत राहीन विचार करायला. मनाला तुमच्या जगण्याची ओढ लागेल आणि मग नकळत तुम्ही "स्व :" शी जोडला जाल, जे "स्व:" तुम्हाला जगण्यास प्रवृत्त करेल, सुंदर रंगीत विचारांच्या फुलांची तुमच्यावर उधळण करेल] आणि मग आत्महत्येस प्रवृत्त करणारे कुपोषित विचार आणि त्या विचारांना बळ देणारे मन आत्महत्या करेल. एक नवसंजीवनी मिळेल त्या मनाला, ज्यात जगण्याची उमेद असेल .....
मग का करावी मी आत्महत्या…???